गेले दोन दिवस लोकल ट्रेन चे जे काही प्रताप चालले आहेत त्याने सामान्य प्रवाशांचे खूपच हाल झाले. मीही कळवा येथे ट्रेन येत नव्हती म्हणून ठाण्याला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. गाडी जशी स्टेशनच्या परिसरात आली ती तिथेच अडकून पडली. खिडकीतून पहिले तर बसच्या मागेपुढे सर्व बाजूला फक्त टूर टूर करणाऱ्या ऑटो रिक्षाच दिसत होत्या. आता स्टेशन पर्यंत चालत जाण्याशिव्याय पर्याय नव्हता. खरच काय गमंत आहे पहा भारतात पेट्रोल, डिझेल यांचे भाव नियमित वाढत असताना रोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने कशी काय रस्त्यावर दाखल होतात?. हेच जर मी ऑटो रिक्षात बसलो असतो तर दुचाकी वाले इकडून, तिकडून आपल्या गाडीला वाट देत, प्रसंगी पादचारी मार्गावर गाडी चढवून पुढे जायला मागतात. जणू पळा,पळा कोण पुढे पळतो हि स्पर्धा लागली कि काय? असे वाटते. हा गाड्यांचा महापूर नव्हे काय?
मग वाटायला लागले कि आपल्या इकडे महापुराची काहीच कमी नाही.